भयंकर! दोन लेकींची हत्या करुन आईने केली आत्महत्या

तेलंगणा । वृत्तसंत्था ।
एका आईने आपल्या दोन मुलींची हत्या करून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून हत्या आणि आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यादद्री भोंगीर जिल्ह्यातील चौटुपाल भागात रामनगरात ही घटना घडली आहे. तुद्रपुरी उमराणी (30) आणि व्यंकटेश यांच्या लग्नाला चौदा वर्ष झाली. त्यांनी हरिणी (12), लस्या (8) आणि शायनी (3) या तीन मुली आहेत. या घटनेबद्दल महिलेचा पती व्यंकटेश याची चौकशी केली असता तो घराबाहेर उघड्यावर झोपत होता आणि उमराणी आपल्या तीन मुलींसह घरात झोपायची.

गुरूवारी सकाळी वेंकटेशने धाकट्या मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला. त्याने दरवाजाच्या दिशेने धाव घेउन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा आतून बंद होता. अखेर शेजारांच्या मदतीने त्याने दरवाजा उघडला तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगी लटकलेल्या अवस्थेत दिसल्या. यामध्ये उमरणी,हरिनी आणि लस्या यांचा मृत्यू झाला होता तर शायनी जीवन मरणाच्या दारात उभी होती. लोकांनी तिला खाली काढून तिचा जीव वाचवला.

उमराणी यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे तिने टोकाचे पाउल उचलले असावे असा पोलिसांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र बय्राच माध्यमांच्या वृत्तांमध्ये पोलिसांचा हवाला देत दारूड्या पतीच्या छळामुळे महिलेने आपले आयुष्य संपवल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट नसल्याने ही हत्या की आत्महत्या याबाबत नेमका अंदाज लावता येत नाही आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Exit mobile version