‘बालभारती’चे चार दिवस व्यवहार बंद

मुंबई | प्रतिनिधी |
पुस्तके व कागदाची भांडार स्तरावर वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी करण्यात येणार असून, त्यापार्श्‍वभूमीवर बालभारतीकडून करण्यात येणार सर्व व्यवहार 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान चार दिवस बंद राहतील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मंडळाची विभागीय भांडारे गोरेगाव, पुणे, नागपूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व व्यवहार (आवक-जावक, विक्री इत्यादी) बंद राहतील, याची पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या सर्व मुद्रक-बांधणीकार व पुस्तक विक्रेते तसेच शैक्षणिक संस्था आदींनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, बालभारतीकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version