| पेण | वार्ताहर |
मुसळधार पावसामुळे पेण तालुक्याला मोठा फटका बसला आहे. बाळगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे पेण तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे. बाळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील खरोशी गावात पुराचे पाणी शिरले आहे. या परिस्थितीमुळे गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपर्क तुटलेल्या गावांमध्ये मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या किनारी राहणाऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले. प्रत्येक तालुक्यामध्ये शेकडो मिलिमीटर पावसाची नोंद झाली. प्रशासन पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहे. पीडितांना आवश्यक ती मदत देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.







