बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली

| मुंबई । वृत्तसंस्था ।
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताने बांगलादेशची अवस्था 8 बाद 133 धावा अशी केली. मोहम्मद सिराजने बांगलादेशची टॉप ऑर्डर उडवली तर कुलदीपने मधल्या फळीला खिंडार पाडले. कुलदीप यादवने बांगलादेशला त्यांच्याच फिरकीच्या जाळ्यात अलगद अडकवले. सिराजने 14 धावात 3 तर कुलदीपने 33 धावात 4 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव 404 धावात संपुष्टात आला. दुसर्‍या दिवशी आर. अश्‍विनने 58 धावा तर कुलदीप यादवने 40 धावांचे योगदान दिले.

भारताने पहिल्या दिवशीच्या 6 बाद 278 धावांपासून पुढे खेळणार्‍या भारताला लगेचच पहिला धक्का बसला. शतकाच्या जवळ पोहचलेला श्रेयस अय्यर 86 धावा करून बाद झाला. त्यानंतर अश्‍विन आणि कुलदीप यादव यांनी आठव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी रचत संघाला 400 च्या जवळ पोहचवले.अश्‍विन अर्धशतकानंतर 58 धावांवरा बाद झाला. तर कुलदीप यादवने कसोटीतील सर्वोत्तम खेळी कर 114 चेंडूत 40 धावा केल्या. कुलदीप 40 धावांवर बाद झाल्यानंतर उमेश यादवने 10 चेंडूत नाबाद 15 धावा करत भारताला 404 धावांपर्यंत पोहचवले. बांगलादेशकडून तैजुल अहमद आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या.

लंचला काही वेळ शिल्लक असताना मोहम्मद सिराजच्या भेदक मार्‍यासमोर त्यांचे एक एक फलंदाज हजेरी लावून जाऊ लागले. सिराज आणि उमेश यादव यांनी बांगलादेशची 4 बाद 56 दावा अशी अवस्था केली. मुशफिकूर रहीमने बांगलादेशला सावरण्याचा प्रयत्न केला. यादवने बांगलादेशचीमधली फळी आपल्या फिरकती फसवली. त्याने मुशफिकूर (28), शाकिब (3), नरूल हसन(16) आणि तैजुल अहमद (0) यांची शिकार करत बांगलादेशची अवस्था 8 बाद 102 अशी केली. अखेर मेहदी हसन मिराजने इबादत सोबत दुसरा दिवस खेळून काढला. दिवस संपला त्यावेळी बांगलादेशच्या पहिल्या डावात 8 बाद 133 धावा झाल्या होत्या अजून बांगलादेश पहिल्या डावात 271 धावांनी पिछाडीवर आहेत.

Exit mobile version