। मुंबई । वृत्तसंस्था ।
जादूटोण्याच्या संशयावरून गावकर्यांनी महिला आणि वयोवृद्धांना हातपाय बांधून जबर मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. दुर्गम अशा जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) येथील ही घटना असून यात सात जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) अशी जखमींची नावे आहेत.मारहाण झालेल्या कुटुंबावर आधी पासूनच गावातल्या लोकांचा जादूटोणा करत असल्याचा संशय होता. त्यातच मोहरमच्या सवारी दरम्यान गावातील काही महिलांच्या अंगात आलं आणि त्यांनी गावातील कांबळे आणि हुके कुटुंबातील लोकांची जादूटोणा करतात म्हणून नावं घेतली.त्यामुळे कसलाही विचार न करता गावकर्यांनी संगनमत करून या लोकांना भर चौकात दोराने बांधून मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली आहे.