। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आरोग्य क्षेत्रासाठी देखील घोषणा करण्यात आली आहे. 0-40 वयोगटातील व्यक्तींचं हेल्थ स्क्रिनिंग होणार आहे. 157 वैदकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहे. संशोधनावर देण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी आधुनिक प्रयोगशाळा बनवण्यात येणार आहे.
भारतीय महिला अॅनिमिया सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे अॅनिमियाची समस्या उद्भवते. या समस्येवर 2027 पर्यंत अॅनिमियावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे दरवर्षी हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. संशोधनावर भर देण्यात आहे. त्यासाठी सास्वयंसेवी संस्थांसोबत एकत्र काम करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक साक्षरतेला चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे.
स्वच्छ पाणी, आहारवर भर
अनेक आजारांचे मूळ कारण हे पाणी आहे. त्यामुळे बजेटमध्ये स्वच्छ पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
220 कोटी लस
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारने 220 कोटी नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.