। खांब । वार्ताहर ।
रोहा-कोलाड मार्ग हा अत्यंत रहदारीचा असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. सध्या हा मार्ग सुरपफास्ट बनविला असल्याने रहदारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशावेळेस या मार्गावर रात्री अपरात्री मुक्तपणे वावर करणारी मोकाट गुरे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. सद्या उन्हाळ्याच्या दिवसात जंगल भागातील गवत नष्ट झाले आहेत, पाणी साठे ही संपलेले आहेत. त्यामुळे ही गुरे पाण्याच्या व अन्नाच्या शोधात नेहमीच या मार्गावर फिरत असतात. तर, दुपारच्या वेळेस प्रखर उन्हामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या सावलीचा आधार घेऊन विसावा घेतात.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांची संख्या वाढल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. याशिवाय कधी कधी रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसून राहिल्याने किंवा रस्ताच अडवून धरल्याने वाहनचालकांच्या निदर्शनास ही गुरे न आल्याने अपघातास कारणीभूत ठरत आहेत. उनाड गुरांमुळे या मार्गावर या पुर्वीही अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत.अपघातास कारणीभूत ठरतब असलेल्या या गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासीवर्ग व वाहनचालक यांच्याकडून केली जाऊ लागली आहे.