उपविभागिय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे आवाहन
| खोपोली | प्रतिनिधी |
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खोपोली शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा ही जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करा. शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन खालापूर उपविभागिय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने खोपोली शहर पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत होणारे कार्यक्रम व निघणार्या मिरवणूकींबाबत उपस्थितांना शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनां प्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला पोलीस निरीक्षक शितल कुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, अभिजीत व्हरंबले, अलोक किस्मतराव, सुधाकर लहाने, नगरपालिकेचे अधिकारी गजानन जाधव, माजी नगरसेवक किशोर पानसरे, कैलास गायकवाड, पत्रकार भाई ओव्हाळ, कार्यकर्ते विकी गायकवाड, विशाल गायकवाड, त्याचप्रमाणे खोपोली शहरातील विविध भागातील विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कार्यकर्त्यांनी नियमाचे पालन करीत वेळेत कार्यक्रम करावे त्याचप्रमाणे मिरवणूक ही वेळेत काढण्यात यावी असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी करीत मिरवणुकी दरम्यान गालबोट लागू नये. यासाठी काळजी घ्यावी यासाठी स्वयंसेवक नेमणूक करण्यात यावी त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, विशेषत: मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षितेची जबाबदारी आयोजकांनी घ्यावी, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची पण काळजी घ्यावी, तुमच्यासोबत आमचे अधिकारी वर्ग कर्मचारी असणार आहेतच तसेच सोशल मीडियावर आलेल्या चुकीचे मेसेज ताबडतोब डिलीट करावी याबाबतची माहिती आम्हाला द्यावी अशीही सुचना कदम यांनी केली. उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम नियोजना बाबतची माहिती दिली. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने माजी नगरसेवक किशोर पानसरे कैलास गायकवाड, विकी गायकवाड यांनी मिरवणूक शांततेत होणार असल्याचे सांगितले. बैठकीचे नियोजन पोलीस नाईक सतीश बांगर, पोलीस अमलदार प्रदीप खरात केले होते.उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक शितल कुमार राऊत यांनी मानले.