| पाली । वार्ताहर ।
उद्योजक चंद्रकांत पाटील यांनी स्वखर्चातून पेडली ते आसरे मार्गावर पडलेले खड्डे बुजवले. हे अंदाजे 3 कि.मी. अंतर आहे, या रस्त्याला अनेक मोठं मोठे खड्डे पडले होते. या मार्गावर अनेक गावे, आदिवासी वाड्या वस्त्या आहेत. शाळकरी विद्यार्थी या मार्गावरून प्रवास करतात. वाहनांची वर्दळ या मार्गावरदेखील सतत असते. शिवाय, येथे प्रसिद्ध असे पुरातन शंकराचे शिवमंदिर आहे. महिन्यातील श्रावण महिना सुरू झाला असून, महाराष्ट्रातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना अडचणींना सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी इतर लोकांशी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत चर्चा केली व त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळाला आणि पडलेल्या पुलावरील खड्डे बुजवले.