। मुंबई । प्रतिनिधी ।
राजकारणात सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्नांची मालिका उमटली असताना मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन जनतेशी संवाद साधला. या फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरे त्यांचा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवणार असल्याचे सांगत ‘माझ्याच लोकांना मी नको असेन तर हे मुख्यमंत्री पद सोडायला मी तयार आहे’, असे भावनिक आवाहनही या लाइव्हच्या माध्यमातून केले आहे.