| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडली. काही ठिकाणी छोटे मोठे वादाचे प्रसंग उद्भवले, तर अनेकांनी बोटाला लावण्यात आलेल्या शाईबाबत तक्रारी केल्या. ही शाई साध्या पाण्याने व टिशू पेपरने पुसली जात असल्याचा दावा करण्यात आला. मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटाला शाई लावली जात असे. पूर्वी ही शाई किमान तीन ते चार दिवस जात नव्हती. मात्र, यावेळी मार्करने लावण्यात येणारी शाई सहज निघून जात असल्याचे अनेक मतदारांनी सांगितले. त्यामुळे ही बाब गंभीर आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक यंत्रणांनी याची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.







