मराठ्यांच्या विरोधात ओबीसी नेत्यांचे षडयंत्र; मनोज जरांगेचा आरोप

| मुंबई | प्रतिनिधी |
मराठा समाजातील मुलांच्या विरोधात सुरु असलेले हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षातील मराठा नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. आमच्या पोरांनी शांततेत आंदोलन केली आहेत. या आंदोलनाला गालबोट लावण्याचा कोणी तरी प्रयत्न करत आहेत. मराठ्यांची पोरं खचली पाहीजेत. मराठ्यांची जात संपली पाहीजे, मराठ्यांच्या जातीतील पोरं मोठी झाली नाही पाहीजेत. यासाठी ओबीसी नेते हे ताकदीने प्रयत्न करत आहेत, असे भुजबळांचे नाव घेता जरांगेनी निशाणा साधला.

हे षड्‌‍यंत्र असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मनावर घ्या, अन्यथा गाठ आमच्याशीच आहे, असा हल्लाबोल जरांगेनी केला. मराठा आंदोलकांना तुरुंगात टाकण्यासाठी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांवर ओबीसी नेत्यांनकडून दबाव आणला जात आहे, असा ओरोपही त्यांनी केला. दलीत, मुस्लीम बांधव हे आमच्या सोबत आहेत, असेही जरांगेनी सांगितले.

Exit mobile version