संविधान बदलण्याचा कट चारशे पारच्या घोषणेतून

| नागपूर | वृत्तसंस्था |

भाजपचे घोषणापत्र जाहीर करण्यात आले असले तरी संविधान बदलण्याचा कट हा त्यांच्या चारशे पारच्या घोषणेतून दिसतो. ते लोकांच्याही लक्षात आले आहे. त्या दृष्टीने लोकांमध्ये संभ्रम तयार करून आणि समजूत घालावी अशी वेळ भाजपवर आली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Exit mobile version