देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाचे थैमान

। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशातील ओमिक्रोन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,630 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 797 आणि दिल्लीत 465 रुग्ण आहेत. ओमायक्रॉनच्या 2,630 रुग्णांपैकी 995 जण बरे झाले आहेत. देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. नव्या रुग्णांपैकी 66.97 टक्के रुग्ण या पाच राज्यामधील आहेत. तर फक्त महाराष्ट्रात 29.19 टक्के रुग्ण आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळचा समावेश आहे. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे.

Exit mobile version