शिव-पनवेल महामार्ग ओलांडणे धोकादायक

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

पाच वर्षात 23 जणांचा नाहक बळी

। पनवेल । ग्रामीण वार्ताहर ।

शिव-पनवेल महामार्गावरील कळंबोली आणि कामोठे परिसरात रस्ता ओलांडताना पाच वर्षात 23 जणांचा नाहक बळी गेला असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे. तसेच, अपघातात 50 नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

सायन-पनवेल महामार्गावर जड अवजड वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहन चालक अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे कामोठे, कळंबोली, खांदा वसाहत आणि खांदेश्‍वर मंदिर येथून महामार्ग ओलांडणे धोकादायक झाले आहे. याकडे सरकारी यंत्रणेकडून नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

कामोठे वसाहतीच्या प्रवेशद्वारावरील भुयारी मार्ग अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहे. भुयारी मार्गाअभावी या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या भुयारी मार्गाचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. कामोठे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षात कामोठे, कळंबोली, खांदा वसाहत आणि खांदेश्‍वर मंदिर येथे महामार्गावर एकूण 62 अपघातात 23 नागरिकांचा मृत्यू झाला असून 50 नागरिक जखमी झाले असल्याची माहिती दिली आहे.

सायन पनवेल महामार्गावर बेदरकारपणे वाहने चालवली जातात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. कामोठे येथील भुयारी मार्ग सुरू करून कळंबोली, खांदेश्‍वर मंदिर आणि खांदा वसाहत येथे रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग अन्यथा स्कायवॉकची नितांत गरज आहे.

अमोल शितोळे,
एकता सामाजिक संस्था, कामोठ

Exit mobile version