तळवडे येथे आंबा बागायतीचे नुकसान

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळजवळील तळवडे येथील शेतकरी दिलीप खंडू शेळके यांची आंब्याची बाग यावर्षी अवकाळी आणि गारपीट यांच्या निशाण्यावर आली. 80 झाडांवरील आंब्याचे नुकसान झाले असून अनेक आंब्याची झाडे कोसळली आहेत. केशर जातीच्या आंब्याची बाग यावर्षी पूर्णपणे नष्ट झाली असून या बागेचे 100 टक्के नुकसान झाले.

यावर्षी आंब्याच्या झाडांना फारशी फळे नसताना शेळके यांच्या आंब्याच्या बागेतील 80 झाडांना केशर आंब्याचा बहर आला होता. त्यामुळे चांगले पीक आंबा उत्पादनातून हाती मिळण्याची खात्री शेळके कुटुंबाला होती.मात्र यावर्षी शेळके कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान आंब्याचा पिकाची नासाडी झाल्याने झाले आहे. दोन दिवस झालेल्या गारपीटीमुळे सर्व आंब्याच्या झाडावरील फळे जमिनीवर कोसळली होती.

Exit mobile version