दानवेंचे फडणवीसांना पत्र

| नागपूर | वृत्तसंस्था |

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांवर जे आरोप आहेत, तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावरही असल्याने त्यांच्याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करणारे पत्र विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले.

दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. नवाब मलिक यांच्यावर भाजपने देशद्रोही असल्याचा आरोप केला होता. दाऊदच्या बहिणीच्या नावे असलेल्या जमिनीबाबत त्यांनी व्यवहार केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे दाऊदच्या खास हस्तकासोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे. मलिकांना महायुतीत घेणे योग्य नाही, असे भाजपचे म्हणणे आहे, तर पटेल यांच्याबाबत तुमची भूमिका काय, याचे उत्तर द्यावे, असे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

Exit mobile version