। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील पालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ रविवारी (दि.4) रात्री साडेआठच्या सुमारास बीड जिल्ह्यातील एक वृद्ध बेशुद्धावस्थेत आढळला होता. या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत मृत वृद्धाची रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोरख किसन हारमळ (76) असे या मृत वृद्धाचे नाव आहे.