ओमीक्रॉनच्या परिस्थितीवर शाळांबाबत निर्णय

मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन विषाणू सापडलेल्या मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार की नाही हाही प्रश्‍न उपस्थित झालाय. त्यावर आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, आम्ही जेव्हा नियमावली बनवली तेव्हा प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करून नियम बनवले. आम्ही टास्क फोर्ससोबत सातत्याने बोलत आहोत. ही नियमावली टास्क फोर्सला देखील पाठवली. त्यावर चर्चा झाली आणि मग ही नियमावली निश्‍चित झाली. याशिवाय काही निर्णय घ्यायचा झाला तर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. परीक्षा असो की इतर गोष्टी आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. त्यानुसारच भविष्यात निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Exit mobile version