शिव भोजन थाळी चालू करण्याची मागणी

| महाड । प्रतिनिधी ।

ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने देश-विदेशासहित राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो शिवभक्त, पर्यटक, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी येतात. मात्र किल्ल्यावर येणार्‍या शिवभक्तांच्या खाण्यापिण्याचे मोठे हाल होत असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिव भोजन थाळी चालू केली होती. शिव भोजन थाळी योजना ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर चालू करून शिवभक्तांना दिलासा देण्याची मागणी पद्माकर मोरे यांनी विद्यमान सरकारकडे एका पत्रकार परिषदेत केली आहे.

Exit mobile version