धवनसेना लंकेवर भारी

पहिल्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय
मालिकेत 1-0 ने आघाडी
कोलंबो | वृत्तसंस्था |
कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 38 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या संपूर्ण संघ 18.3 षटकात गुंडाळला. श्रीलंकेचा संघ केवळ 126 धावा करु शकला.
भारताकडून सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्‍वर कुमारने निर्णायक खेळी केली. सूर्यकुमार यादव दमदार अर्धशतक ठोकलं, तर भुवनेश्‍वरने महत्त्वाच्या चार विकेट्स पटकावल्या. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेची सुरुवातच खराब झाली. श्रीलंकेकडून असालांकाने 26 सर्वाधिक 44 धावा केल्या. अविष्का फर्नांडोने 26 धावा, दसुन शनाकाने 16 धावा आणि मीनोद भानुकाने 10 धावा केल्या. श्रीलंकेच्या इतर खेळाडूंना धावांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून भुवनेश्‍वर कुमारने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, दीपक चहरने दोन आणि कृणाल पांड्या, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
त्याआधी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. पृथ्वी शॉनंतर मैदानात उतरलेला संजू सॅमसनने शिखर धवनसोबत टीम इंडियाचा डाव सावरला. मात्र, 51 धावांची भागीदारी करत संजू सॅमसनदेखील 27 धावा करुन बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. दोघांना मिळून 52 धावांची भागिदारी केली. मात्र, 14 व्या षटकात शिखर धवन 46 धावांवर बाद झाल. त्यांतर 15 षटकात सूर्यकुमार यादवही 50 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने 10, ईशान किशनने 20 आणि कृणाल पांड्यांना 3 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून हसरंगा आणि चमीरा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स, तर करुणारत्नेने एक विकेट घेतली.

Exit mobile version