अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सत्यवाडी होंडावाडी व तागवाडी येथील वीजपुरवठा 6 दिवस खंडित झाल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू होते. यावर शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी अभियंत्यासोबत बोलून काम सूचना केल्याने अखेर 6 दिवसानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे ग्रामस्थांची पंडित पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.
मधुकर ढेबे यांनी पाठपुरावा करून 25 k V A ची न घेता तीन गावांचा विचार करून 63K V A ची मिळावी ही मागणी धरून ठेवली. शेवटी माजी आमदार पंडित पाटील यांनी अभियंत्यांसोबत बोलून यंत्र सामुग्री देण्यास भाग पाडले. मोरोंडे ते सत्यवाडी कच्या मातीच्या रस्त्यावरून नेण्याचे ग्रामस्थ, गाडी चालक आणि वायरमन या सर्वांचे देखील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.