• Login
Sunday, January 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

शिंदे यांचे महानाट्य

Varsha Mehata by Varsha Mehata
January 7, 2024
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
86
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजीमहाराजांच्या जीवनावर जाणता राजा नावाचा एक महाप्रयोग करीत असत. त्यात खरोखरीचे हत्तीघोडे, पालख्या आणि शेकडो कलाकार असत. भव्य-दिव्य सर्कसवजा नाटक असा तो प्रकार असे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतला शासन आपल्या दारी हाही असाच एक महाप्रयोग असतो. शेकडो एसटीच्या गाड्या कामाला लावून लाखो लोकांना जमा केले जाते. थाटामाटाचे मंडप, स्टेज उभारले जातात. झाडून सगळे राजकीय नेते, अधिकारी जमा होतात. मंत्री लोक एकाहून एक असे काही बेफाट शेकडो कोटींचे आकडे फेकतात की जाणता राजातील युद्ध त्यापुढे काहीच नाही असे भासावे. रायगड जिल्ह्यातील लोकांसाठी नुकत्याच या महाप्रयोगाचे सादरीकरण झाले. शासन आपल्या दारीचा हा विसावा कार्यक्रम होता. प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोकांना काही ना काही वाटपाचे कार्यक्रम केले जातात. तसे यावेळी तळियेतील दरडग्रस्तांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. तळियेची दुर्घटना 22 जुलै 2021 मध्ये घडली. त्यानंतर शेकडो लोक कंटेनरमध्ये राहत होते. 66 कुटुंबांची घरे पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. पण त्यांनाही इतक्या दिवसात घर मिळू शकले नव्हते. म्हाडाकडे हे काम होते व सतत नवनवे वायदे केले जात होते. त्यातच जी घरे बांधली त्यापैकी एकाचा पायाच खचला तर काहींना तडे गेले अशा बातम्या गेल्या पावसाळ्यात आल्या होत्या. आता अखेर या कुटुंबियांना जी घरे मिळाली आहेत ती तरी पक्की व सुरक्षित असतील अशी अपेक्षा आहे. इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांचे तीन महिन्यात पुनर्वसन केले असे उदय सामंत यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. पण तेथे जी 44 घरे बांधली जात आहेत त्यांचे काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल असा सरकारी वायदा आहे. अशा स्थितीत त्यांचे पुनर्वसन झाले असे कसे म्हणता येईल? एकूण, व्यासपीठांवरून नेते बोलतात ते बहुदा लोक ऐकत नसावेत किंवा ऐकले तरी फारसे मनावर घेत नसावेत.

लाभार्थी नव्हेत, मालक

भरमसाठ आकड्यांची बरसात करणे ही भाजपच्या राजवटीची खासियत आहे. शिंदे यांनीही ती उचलली आहे. रायगड जिल्ह्यातील 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटींपेक्षा जास्त लाभ मिळाले असे ते म्हणाले. हे लाभ नेमके कोणते हे न सांगता इतके शेकडो कोटी सरकारने वाटले असे म्हणून त्याचे श्रेय घेणे हा एक गंमतीदार प्रकार आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, दारिद्य्ररेषेखालचे लोक, अपंग, विधवा, दलित वा अन्य मागास लोक इत्यादींसाठी अनेक योजना कित्येक दशकांपासून चालू आहेत. शेतकऱ्यांना काही प्रकारची अनुदाने व नुकसान झाली तर भरपाई देण्याचा कार्यक्रमही जवळपास स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालू आहे. गरीब लोकांसाठीची घरबांधणी किंवा संडास बांधण्यासाठी निधी इत्यादी लाभ काँग्रेसच्या सरकारांच्या काळापासून दिले जात आहेत. शिंदे आणि मंडळी जो 1700 कोटींचा आकडा सांगत आहेत त्यात या सर्व योजनांमधील पैसे वा लाभवाटपाचा समावेश आहे. हे दडवून ठेवले जाते. याच रीतीने आतापर्यंतच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमांमध्ये दोन कोटींहून अधिक लोकांना लाभ दिले आहेत असा दावा केला गेला. या लोकांना सध्याच्या काळात लाभार्थी म्हटले जाते. असे म्हणून लोक म्हणजे कोणीतरी याचक आणि सरकार म्हणजे कोणीतरी उदार राजा असल्याचे चित्र उभे केले जाते. हा खरे तर सामान्य जनतेचा अपमान आहे. कारण, जनता हीच खरी मालक आहे. गरिबांची फी माफ करण्यात वा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात सरकार त्यांच्यावर कोणताही उपकार करीत नाही. तो त्यांचा हक्कच आहे. एरवी उद्योगपतींची हजारो कोटी रुपयांची कर्जे सरकारी बँका माफ करतात. त्या मानाने विकासाच्या प्रक्रियेत मागे पडलेल्यांना फारच थोडे पैसे दिले जातात व ते देतानाही सरकार ही जी उपकाराची भावना दाखवते ती आक्षेपार्ह आहे.

सगळेच गुलदस्त्यात

परवाच्या कार्यक्रमात कोकण विकासासाठी पाचशे कोटी रुपये दिले असल्याचेही सांगितले गेले. तेही पैसे नेमके कशासाठी खर्च होणार याचा खुलासा झालेला नाही. कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वीस हजार कोटींचा नवा उद्योग येतो आहे असेही सांगितले गेले. हा उद्योग एक की अनेक, तो कोणता आणि त्यातून नक्की किती स्थानिकांना रोजगार मिळणार हे गुलदस्त्यात ठेवले गेले. याबाबत रायगड जिल्ह्यातील जनतेने अनेक वाईट अनुभव घेतले आहेत. जिल्ह्यात अनेक नवीन उद्योग येत आहेत. मात्र त्याबाबत स्पष्ट कल्पना स्थानिकांना दिली जात नाही. काही वेळेला अचानक एखाद्या भागातील जमिनींचे सर्वेक्षण सुरू केले जाते. अलिकडेच शहापूरजवळ असाच प्रकार झाला. हा उद्योग काय स्वरुपाचा असणार, त्यात किती जमीन लागणार, किती रोजगार उपलब्ध होणार, प्रदूषणाच्या शक्यता काय आहेत अशा गोष्टींची खुली चर्चा कधीही केली जात नाही. छुप्या रीतीने गोष्टी रेटण्याचा प्रयत्न केला जातो. जनतेला याबाबतची माहिती अनमान धपक्याने व तुकड्यातुकड्याने मिळते. मुख्यमंत्र्यांनी नवा उद्योग येणार असल्याची केलेली घोषणाही याचाच मासला आहे. रोजगार वाढणार असले तरी ते कोणत्या स्वरुपाचे असणार व कोकणातील स्थानिक लोकांना त्याचा खरेच फायदा होणार का हा महत्वाचा प्रश्न असतो. अन्यथा, येथे परप्रांतियांचीच भर केली जाते. अलिबागजवळच्या गेलच्या प्रकल्पातील तसा अनुभव आहेच. खरे तर रायगडातच नव्हे तर पूर्ण कोकणातच निसर्गावर घाला घालणारे प्रकल्प आता थांबवायला हवेत. किनारे व सह्याद्रीतील पर्यावरण हे अत्यंत नाजूक असून त्याचे रक्षण करणे आवश्यक असल्याचा इशारा माधव गाडगीळ समितीच्या अहवालात दिला होता. रायगडातही आता रासायनिक व प्रदूषणकारी नव्हे तर पर्यटनाला चालना देतील अशा उद्योगांची अधिक गरज आहे. शासन आपल्या दारी यासारखा महाप्रयोग आणि त्यातली आकड्यांची आतषबाजी यात हा प्रश्न गुंडाळून टाकला जातो. हा प्रयोग झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करायला जावे हा अगदीच योगायोग नसावा.    

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

देशांतर्गत महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

Next Post

ट्रम्प अडचणींच्या गर्तेत

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
सावधान! भोगावती नदीने ओलांडली धोक्याची पातळी

ट्रम्प अडचणींच्या गर्तेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?