| उरण | वार्ताहर |
उरण विमला तलाव येथे दरमहा 17 तारखेला भरणाऱ्या मधुबन कट्टा 31 डिस़ेंबर या विषयावर कवी संमेलन झाले. 31 डिसेंबरसंबंधी आनंद आणि दु:ख व्यक्त करणा-या कविता ऐकून 31 डिसेंबर कसा साजरा करायला हवा, यांचे प्रबोधन झाले. यावेळी चंद्रकांत कडू, गणेश पाटील आणि ज्ञानेश्वर कोठावळे यांना जीवनगौरवाने सन्मानित करण्यात आले. कविसम्मेलनात निमंत्रित कवी एन एम पाटील, प्रज्ञा म्हात्रे यांच्या कवितांचे वाचन झाले. रामचंद्र म्हात्रे, भरत पाटील, कुमार शिवकर, विराम उपाध्ये, भ.पो. म्हात्रे, संग्राम तोगरे, भालचंद्र म्हात्रे, मारुती तांबे, रायगड भूषण प्रा एल बी पाटील यांनी कवितांचा आनंद रसिकांना दिला. कार्यक्रमाला सुरेश ठाकूर, जयवंत पाटील, नरेंद्र ठाकूर, अनिल म्हात्रे, मीना पाटील, चंद्रकांत मुकादम, रुपेश माळी, सुरेश शिंदे, वी. वैशंपायन अजय शिवकर आदी उपस्थित होते.