। उरण । वार्ताहर ।
उपविभागीय अधिकारी महसूल पनवेल यांनी विरार-अलिबाग कॉरिडोरसंदर्भात भूसंपादनाविषयी नोटीस काढली होती. त्या नोटीसीबाबत विरार-अलिबाग रस्ता शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रांत अधिकारी पनवेल यांच्याकडे शेतकर्यांच्या वतीने लेखी हरकती देण्यात आल्या.
विरार-अलिबाग कॉरिडोर हा शासनाचा बहुउद्देशिय प्रकल्प उरणमधील पूर्व विभागातून जात आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी राखलेल्या आपल्या पूर्वजांच्या जमिनी संपादित होणार आहेत. त्यामुळे येथील शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, या गावांनाही या कॉरिडोरमुळे धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांनी या भूसंपादनास विरोध दर्शवीत आपल्या हरकती दाखल केल्या आहेत.
यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ठाकूर, रमण कासकर, कॉ. शेखर ठाकूर, मोहिते, सचिव, रवींद्र कासुकर, रमेश पाटील आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.