। कोर्लई । वार्ताहर ।
शासनाच्या शेतीविषयक पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकर्यांनी पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून साचून ठेवले पाहिजे व त्याचा योग्य जपून वापर केला पाहिजे. याबरोबरच शेतात ठिबक सिंचन, तुषार सिंचन चा वापर केल्यास पाण्याची चांगल्याप्रकारे बचत होईल असे प्रतिपादन मुरुड तालुक्यातील नांदगावमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॅम्पस सांगली मार्फत नूतन नर्सिंग स्कूलमध्ये आयोजित शेतीतील पाणी व्यवस्थापन विषयक आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत समाज कार्याच्या विद्यार्थीनी पूजा मेखले यांनी केले.
शेतातील पाणी व्यवस्थापन व पाण्याचे महत्त्व या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख व्याख्याते सुग्रीव चव्हाण, सचिन जाधव, आनंद तोंडले-पाटील,शालिकराव पावरा, प्राजक्ता सुर्वे, शिक्षक वृंद, गुरुपाद नाईक, मयुरी पुलेकर, सर्व कर्मचारी उपस्थित यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी नर्सिंग स्कूलमधील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पेरवे तर उपप्राचार्या प्राजक्ता सुर्वे यांनी आभार मानले.