तळावासियांमधून समाधान व्यक्त
| तळा | वार्ताहर |
बहुप्रतिक्षित असलेली तळा शहराची पाणी योजना अखेर मार्गी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी 13 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तळा शहरवासियांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून तळा शहराच्या पाणी योजनेचे काम रखडले होते. शहरात वेळेवर पाणी मिळत नसल्याने येथील बहुतांश कुटुंब, नागरिक, शासकीय कर्मचारी शहर सोडून इतरत्र रहायला गेले आहेत. याचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाल्याने येथील अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली होती. दरम्यान, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान महाभियानातून 13 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली.