चेन्नई | वृत्तसंस्था |
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्याजवळ फटाके बनवणार्या कारखान्याला भीषण आग लागलीय. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी मेघनाथ रेड्डी यांनी ही माहिती दिलीय. फॅक्टरीत अचानक झालेल्या स्फोटानंतर ही आग लागल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. जिल्ह्यातील शिवकाशीजवळील मेट्टुपत्ती गावात ही घटना घडली.
शनिवारी सकाळी फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली. यामुळं अनेक स्फोट झाले, तर आगीत सात गोदामं आणि शेड जळून खाक झाली आहेत. कारखान्यात फटाके आणि रसायनांचा मोठा साठा होता. रसायनं हाताळताना घर्षण झाल्यानं हा स्फोट झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणली जात आहे.