| रत्नागिरी । वार्ताहर ।
जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात रवाना झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतून सहदेव पावसकर यांच्या बागेतून ही पेटी रवाना झाली. चार डझनांच्या या आंबा पेटीला 20 हजारांचा भाव मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी पुणे बाजारापेठेसाठी रवाना झाली आहे. विशेष म्हणजे पावसकर यांनी या वेळी वेगळा प्रयोग करत काही कलमांवर त्यांनी शेड मारली. त्यामुळे अवकाळी पावसातही कलमे सुरक्षित राहून आता त्याचे फळ त्यांना मिळाले.यंदाच्या आंबा हंगामानेही बागायतदारांना चिंता लावली आहे. सुरुवातीला कलमे चांगली मोहरली. मोहर चांगला आल्याने बागायतदारांने तो टिकून राहावा, यासाठी फवारणी केली. मात्र निसर्गाचे दृष्टचक्र कायम होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांच्या स्वप्नावर विरजन घातले. मोहर मोठ्या प्रमाणात गळाला.
त्यानंतर थंडी कमी जास्त होऊन विचित्र वातावरण निर्माण झाले. रात्री कडक थंडी आणि दुपारचे कडक ऊन, असे वातावरण होते. त्याचा फळधारणेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे यंदाही आंबा उत्पादनात मोठी घट होईल, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.परंतु काही बागायतदारांनी निसर्गावर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्या प्रयोगशील शेतकर्यांपैकी गावखडीतील सहदेव पावसकर हे एक आहेत. त्यानी या अवकाळी पावसापासून कलमांचे रक्षण व्हावे, म्हणून काही कलमांवर शेड मारले आहे.शेडमुळे कलमं सुरक्षित राहून चांगली फळधारणा झाली. आज त्यांच्या बागेती या सुरक्षित कलमांचे फळ तोडायला आहे. त्यांनी जिल्ह्यातील पहिली 4 डझनची आंबा पेटी पुण्याला पाठविली आहे. सहदेव पावस्कर यांची चार महिन्यांपासून यासाठी मेहनत घेतली होती.