रणत्या उन्हात जणू रंगांची उधळण
। पाताळगंगा । काशिनाथ जाधव ।
रणरणत्या उन्हामध्ये झाडा वेळींना आलेली विविध प्रकारच्या फुलांमुळे निसर्गाच्या सौंदर्य सृष्टीत भर घालली जात आहे. चैत्राच्यात अगमनाने जणू ही फुले बहरली असून रणरणत्या उन्हात ही फुले रंगांची जणू उधळण करीत आहे की काय? असा भास प्रवास करीत असलेल्या वाटसरु यांना जाणवू लागले आहे.
वृक्ष-वेळींवर आलेली चमकदार रंगाची सुंदर फुले बहरली असून चैत्र महिन्यामध्ये याच वृक्षांना बहार येत असल्यामुळे मनाला एक प्रकारचा आनंद देत असतात. उष्ण व दमट वातावरणात चांगली वाढ होत असल्यामुळे शेताच्या बांधावर रस्त्यांच्या कडेला अशा विविध ठिकाणी ही फुललेले फुले विविध भागात आढळून आहे.
सध्या उन्हाळा असल्याने ही झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे फुलांचा टवटवीतपणा असतो. तर काही फुलांना गंध नसला तरीही त्याचे सौंदर्य मनाला भुरळ घालत असतात. अशी नानाविध जातीची फुले चैत्र व वैशाखात बहरतात. हिरव्यागार पानातून डोकावणारे फुले स्वत:च्या वेगळेपणाची साक्ष देत असतात, याची अनुभूती तालुक्यांच्या ठीकाणी पहावयास मिळत आहे.
चैत्राच्या उन्हाने होरपळणार्या जिवांना एखाद्या हिरव्यागर्द वृक्षांचे दर्शन होणे, त्यातच हिरव्या पानांतून लालचुटूक फुलांचे डोकावणे मनाला आनंदी करते. सृष्टीवर इतर वृक्षांची पानगळ होत असतानाच काही झाडे मात्र आपले अस्तित्व सांभाळून असतात. पाने, फुले याच दिवसात बहरुन येतात. कुठे एखाद्या उजाड डोंगरमाथ्यावर हरवलेले एखादे रानफूल नजर वेधून घेते. या उन्हाच्या छोटेसे फूल कसे बरे टवटवीत आहे? असा विचार मनाला पडतो. निसर्गाची ही किमया उन्हाळ्यात अनेक फुलांच्या बाबतीत पहावयास मिळत आहे.