। पेण । संतोष पाटील ।
पेण तालुक्यात नागरिकांची सध्या सेतू महा ई-सेवा केंद्रातून लूट सुरु असून,मुद्रांक विक्रेत्यांची सुध्दा मनमानी सुरु केल्याने सर्वसामान्य कमालीची हैराण झालेली आहे. पेण तहसिल कार्यालय,पेण पोलिस स्टेशन, दुय्यम निर्बधक श्रेणी 1 कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय वनक्षेत्रपाल आणि कोषागृह अशी सर्व कार्यालय एकत्र असल्याने रोजच्यारोज या ठिकाणी हजोरांच्या संख्येने नागरिक आपल्या कामानिमित्त येत असतात आपली कामे एकाच दिवसात व्हावी म्हणून चार पैसाचा विचार न करता हे नागरिक मुद्रांक विक्रेत्यांना गाठतात.
महत्त्वाची बाब म्हणजे मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांक विकण्याचे काम करायचे असते परंतु ही मंडळी कायदेशीर, बेकायदेशीर सर्व कामे करतांना दिसतात तसेच प्रत्येक मुद्रांक विक्रेत्याकडे चार, चार ते पाच, पाच मदतीसाठी सहकारी कामाला आहेत. शासने ज्या वेळी यांना मुद्रांक विकण्याचा परवाना दिला त्यावेळी काही नियम व अटी घालून दिल्या आहेत परंतु त्या नियम व अटी पाळतांना एक ते दुसरा मुद्रांक विक्रेता आपल्याला पाहायला मिळतो बाकी सर्व बेजबाबदार पणे सरकारने दिलेल्या परवानगीचा गैरवापर करतांना दिसतात.
शासनाने नियम घालून दिल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्रासाठी 35 रूपये सेवा श्ाुल्क आकारला आहे परंतु सर्वसामान्यांकडून ते 50 रूपये घेतले जातात. एैपत दाखल्यासाठी शासनाने 50 रुपये सेवा शुल्क ठेवला आहे. परंतु ही मंडळी 100 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत फी आकारतात एखदया सुज्ञ नागरिकांनी या विषयी विचारणा केली तर त्याला अद्वा तद्वा बोलेले जाते. एका दिवसात काम व्हावे या अपेक्षाने आलेले नागरिक देखील वाद घालण्याच्या फंडात पडत नाहीत त्यामुळेच या मंडळींचा धाडस वाढतो. आपले कुणी काही वाकडे करु शकत नाही या आत्मविश्वासाने ही मंडळी नागरिकांची लुट करतच आहेत. हे झाल तहसिल कार्यालयाच्या संबंधीत हीच अवस्था दुय्यम निर्बंधक श्रेणी 1 च्या कार्यालयात सुध्दा सुरू आहे. या कार्यालयात खरेदी खत करण्यासाठी येणार्या नागरिकांची देखील फसवणूक केली जाते.
अधिकार्याच्या नावाने देखील 2 हजारा पासून ते 5 हजारा पर्यत प्रत्येक दस्ताव्या मागे जास्तीचे पैसे उकळले जातात. याला अधिकारी वर्गाचा देखील छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. तसेच भूमिअभिलेख कार्यालयातून जुने दस्तावेत अगर नकाशे काढायचे असतील तर त्यासाठी देखील मुद्रांक विक्रेत्याकडून जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे मुद्रांक विक्रेत्यांना दिलेले हक्क किती आणि ते करत असलेले काम या गोष्टीचा देखील विचार शासनाने करणे गरजेचे आहे. शासनाचे अधिकारी या बाबीकडे काना डोळा करत असल्याने या मंडळीचे फावत आहे. व जनसामान्यांची लुट होत आहे.
रेशन कार्डवर नाव वाढविणे अगर नाव कमी करणे यासाठी तर मुद्रांक विक्रेते 50 रुपयांपासून 2000 हजार रुपयांपर्यंत पैसे आकारतांना दिसतात महत्वाची बाब म्हणजे रेशन कार्डवर नाव वाढविणे अगर कमी करण्यासाठी 50 रुपयांच्या वर खर्च येत नाही. मात्र सर्वसामान्यांच्या नडीचा फायदा घेउन मन मानेल तशी लुट करत आहेत. याविषयी तहसिलदार स्वप्नाली डोइफोडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी दोन दिवसा पूर्वीच पेण कार्यालयाचा पदभार सांभाळलेले आहे त्यामुळे सर्व माहिती घेउन योग्य ती माहिती प्रसार माध्यमाला पुरविली जाईल.