| मुंबई | वृत्तसंस्था |
गेल्या आठवड्यात उल्हानगरमध्ये काही तरूणांची टोळी फिरत असल्याचे आणि कोणाचा तरी शोध घेत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संतोषनगरमध्ये काही दिवसांपुर्वी रात्रीच्या सुमारास 20 जणांची टोळी कोणाच्या तरी शोधात फिरत होती, ही टोळी संतोषनगर मधील एका तरुणाची हत्या करण्यासाठी आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी (दि.9) तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास उल्हासनगर कँप नंबर ४ संतोषनगर येथे काही तरुणांचे टोळी सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. काहींचा चेहरा रुमालाने बांधून झाकून घेतलेला तर काहींच्या डोक्यावर हुडी अशा अवतारात २० तरूण एकामागोमाग एक एका ठिकाणी जमा झाले. काहींच्या हाताच तलवार, चाकू, दांडकी तर काहींच्या हातात चॉपर होते. बराच वेळ कोणाच्या तरी शोधात असल्यासारखे फिरत होते आणि त्यानंतर एकामागोमाग चालत निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. एका तरुणाची हत्या करण्यासाठी ते फिरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शहरात फिरणाऱ्या या अज्ञात तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तरूणांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच नागरिकांना कायदा हातात घ्यायला लावू नका असे आवाहन देखील बोडारे यांनी पोलीस प्रशासनाला केले आहे.
उल्हासनगरमध्ये 20 जणांची टोळी सीसीटीव्हीत कैद
![](https://krushival.in/grygrars/2022/08/crime-news-kothrud_202112740408-e1682431848892-1024x627.jpg)