राज्यात लुटारुंची टोळी सक्रीय

। लातूर । प्रतिनिधी ।

राज्यात सध्या लुटारूंची टोळी आहे. तेच सत्ताधारी आहेत. सुरुवातीला प्रधानमंत्री मोदींनी बेटा अजितवर आरोप केला. त्यानंतर त्यांना बेटा कितना खाया, असे विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या, अशी जहरी टीका मोदींसह अजित पवारांवर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लातूरमध्ये काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी नवनिर्वाचित विजयी खासदारांचा सत्कार करण्यात आला. राज्यात सत्ताधार्‍यांचे जे काही सुरु आहे. त्याचा हिशोब सर्वसामान्य जनता घेतल्या शिवाय राहणार नाही, असे ही ते म्हणाले. सर्व उद्योगधंदे गुजरातला पाठवल जात आहेत. राज्य गुजरातकडे गहाण ठेवले आहे, असे म्हणत वडेट्टीवारांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला.

Exit mobile version