हायकोर्टाचे आदेश
मुंबई | प्रतिनिधी |
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे यांना नोटीस दिली जावी. समीर वानखेडे यांच्यावर तूर्तास कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने राज्य सरकारला दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वानखेडे यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारकडूनही आपली भूमिका मांडण्यात आली. सुमारे अर्धा तास चाललेल्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे.