सरकारने शक्ती कायदा अंमलात आणावा- सिताराम कांबळे

। खरोशी । वार्ताहर ।
मुंबई येथील साकीनाका परिसारातील सामुहिक बलात्काराला बळी पडलेल्या 32 वर्षीय महिलेचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुदैवी बाब आहे. राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाण्या आहेत. महिलांच्या सुरक्षितते करीता सरकारने राज्यात शक्ती कायदा अंमलात आणावा अशी मागणी पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सिताराम कांबळे यांनी केली आहे. ते म्हणाले की, राज्यभरात महिलांवर होणारे अत्याचार निंदनीय असून या घटनांचा पी.आर.पी.तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे. अलिकडे राज्यातील महिलांवरील वाढत असलेल्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक ठरत आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृती होऊ नये, महिलांवरील अत्याचार रोखले जावेत अशी मागणी पी.आर.पी.चे रायगड जिल्हा अध्यक्ष सिताराम कांबळे यांनी केली आहे.

Exit mobile version