। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीकडे कचर्यासाठी घंटागाडी नसल्याचे उघडकिस आले आहे. त्यामुळे रस्त्यावर आणि अन्यत्र कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसून येत आहे.
पनवेल तालुक्यात एकूण 71 ग्रामपंचायती आहेत. यातील 17 ग्रामपंचायतीकडे घंटागाडीच नाही. येथील ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती नसल्याने घंटागाडी घेता येत नाही. परिणामी येथे कचरा वाढू लागलेला आहे. पनवेल तालुक्यात डम्पिंग ग्राउंड नसल्याने कचर्याची समस्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. कचरा कुठेही आणि कसाही रस्त्यावर, मोकळ्या जागेत फेकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. शिवाय मच्छरांचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे पनवेलमध्ये कचर्याच्या समस्याने उग्ररूप धारण केलेले आहे. गावांमध्ये जाताना रस्त्यावर प्रचंड कचरा साचलेला दिसून येतो. येथील प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी नाही. येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने व रहिवासी संख्या वाढत असल्याने कचर्याची समस्या देखील बिकट होत चालली आहे. यातील एका ग्रामपंचायतने सात ते आठ लाख रुपये खर्च करून काही वर्षांपूर्वी घंटागाडी घेतली मात्र या घंटागाडीचा अद्याप उपयोग झालेला नाही. ती गंजू लागली आहे.