| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी शहर परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात रस्ते निसरडे झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी नवानगर येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली आहे. गुरुवारी (दि.12) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. काळबादेवी नवानगर येथील वळणावर चालकांना अंदाज न आल्याने तसेच पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने रस्ता निसरडा झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. एक बस रत्नागिरीच्या दिशेने जात होती, तर दुसरी बस ग्रामीण विभागाची असून ती गणपतीपुळेच्या दिशेने जात होती. या अपघातात दोन्ही बसच्या चालकांना किरकोळ दुखापत झाली असून बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.