| खोपोली | प्रतिनिधी ।
अमृत महोत्सव निमित्त अलिबाग ते खोपोली 75 कि.मी अंतराची मशाल दौड रॅली खोपोली नगरपालिका आपघातग्रस्त सामाजिक संस्था तसेच विविध संघटनांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. देशभक्ती,स्वच्छता मोहिम,पर्यवारण,माझी वसुंधरा,प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र तसेच निरोगी आयुष्य असा संदेश देण्यात आला.
रॅलीचे आयोजन करण्याची संकल्पना क्रिडा शिक्षक जगदीश मरागजे यांनी मांडली होती. रविवार दि.14 आँगस्ट रोजी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पटांगणात उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी मशाल प्रज्वलित करून सहभागी धावपटूंच्या हाती सुपूर्द केली. यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर, डॉ.सतिश कदम, नायब तहसिलदार मनोज गोतारणे, खोपोलीचे नगरपरिषदेचे प्रशासक, मुख्याधिकारी अनुप दुरे, उपमुख्याधिकारी गौतम भगळे, अपघातग्रस्त संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर, धनंजय गीध, सचिन बोरणा, अमित विचारे, भाऊसाहेब कुंभार, राजाराम कुंभार, तपस्वी गोंधळी,टाटा पॉवरचे बसवराज नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राजेश पराठे, सुरेखा खेडकर, महेश भोसले, विजय भोसले, विजय घरत, मंगेश चाळके, संतोष मोरे, भक्ती साठेलकर, संजय म्हात्रे, विकास मोरे, हरी सुर्यवंशी, प्रविण भोये आदि उपस्थित होते. रॅली यशस्वी करण्यासाठी विविध संघटनांनी केलेल्या मदतीमुळे खालापूरचे तहसिलदार आणि नगरपालिकेचे प्रशासक, मुख्याधिकारी यांनी खोपोलीकरांचे कौतुक केले.
लक्ष्यनीय उपस्थिती
खोपोली शहरातील सर्वच भागात 20 किमी अंतर रँली फिरल्यानंतर शिळफाटयावर रात्रौ 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तहसिलदार आयुब तांबोली आणि मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे ज्योत व तिरंगा सुपुर्द करून दौड समाप्त करण्यात आली. यावेळी खोपोली शहरातील तरूणवर्ग,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.