। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
पश्चिम बंगालमधील आयोजित भवानीपूर येथील पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान बंगालवासीयांना आश्वासन देताना माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी यांनी, मी मोदी-शहा यांना दादा म्हणेल, हा शिष्टाचार आहे. मात्र मी जिंकले तर देशात तालिबानी राजवट लागू होऊ देणार नाही, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी पुढे म्हणताना त्या म्हणाल्या की, निवडणुक प्रचारदरम्यान, मी जिंकले नाही तर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री बनेल. तुमचे प्रत्येक मत माझ्यासाठी मौल्यवान आहे. यावेळीही मला मत द्या, नाहीतर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री बनेल. दरम्यान, यावेळी त्यांनी अनेक वक्तव्य केलं असून आपण लोकांचे तारणहार असल्याचे प्रचारावेळी म्हटले आहे. तसेच नंदीग्राममध्ये निवडणूक लढण्यास सांगितल्यावर मी शेतकरी आंदोलनासाठी लढले. मात्र माझा पराभव का झाला हे सर्वांना माहित असून हे प्रकरण न्यायालयात गेले असल्याची आठवणही त्यांनी काढली.