महत्वाची बातमी! नागाव-पाल्हे पुलावरून पाणी

| अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलिबाग- रेवदंडा मार्गावरील पाल्हे पुलावरून पाणी वाहत असून दुचाकी गाडी पुलावरून वाहून गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी या मार्गावरू प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच जोरदार पावसामुळे नागावमध्ये भिमेश्वर तळ्याची भिंत देखील कोसळली आहे.

Exit mobile version