करंजाडेतील प्रवाशांची मागणी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
वाढत्या प्रवासी संख्येमुळे करंजाडे वसाहत ते पनवेल रेल्वे स्थानकापर्यत सुरु असलेली नवी मुंबई महापालिकेची बससेवा अपुरी पडत असून, प्रवाशांना बसची वाट पाहात ताटकळत उभे राहावे लागत आहे. एनएमएमटीने बस फेर्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी करंजाडे वसाहतीमधील नागरिक करीत आहेत.
रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी करंजाडेतील रहिवासी नवी मुंबई पालिकेच्या बससेवेवर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे या प्रवासासाठी शेअर रिक्षासुद्धा उपलब्ध आहेत. मात्र, रेल्वे स्थानक ते करंजाडे वसाहतीपर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे स्टेशन ते वसाहत हा प्रवास अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा किंवा बसची वाट पाहात ताटकळत बसावे लागत असल्याने एनएमएमटी बसच्या फेर्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी कंरजाडे नोड पलॅट ओनसॅ वेल्फेअर असोसिएशन पनवेलचे अध्यक्ष चंद्रकांत महादेव गुजर यांनी पत्राद्वारे केली आहे.
मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालयात कामाला असलेला कामगार वर्ग करंजाडे यथे मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. कामा ठिकाणी पोहोचण्यासाठी ते लोकल रेल्वेचा वापर करतात, करंजाडे वसाहतीत रेल्वे स्टेशन उपलब्ध नसल्याने रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी त्यांना रिक्षा अथवा एनएमएमटी च्या 76 क्रमांकच्या बसचा वापर करावा लागतो. अनेक भागात वाहतूक कोंडी होऊन रिक्षा तसेच बस वाहतूक कोंडीत अडकत असल्याने रेल्वे स्थानकातून वसाहतीत प्रवासी पोहोचवण्यात वेळ लागतो. तसेच वसाहतीमधून पुन्हा रेल्वे स्थानक वेळेत गाठने शक्य होत नसल्याने कामावरून परतणार्या कामगारवर्गाचे मोठे हाल होत आहेत.
नवी मुंबई महापालिका परिवहन महामंडळाच्या बसच्या फेर्यांमध्ये वाढ झाल्यास प्रवाशांना होणारी गैरसोय दूर होईल. त्यामुळे बस फेर्या वाढवाव्यात, अशी अपेक्षा आहे.
चंद्रकांत महादेव गुजर, अध्यक्ष,
कंरजाडे नोड पलॅट ओनसॅ वेल्फेअर असोसिएशन