| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत संपल्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांना संथगतीबद्दल दंड ठोठावला. यासोबतच दोन्ही संघांचे विश्व कसोटी अजिंक्यपदाचे गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकलेल्या अवघ्या एका कसोटी सामन्याच्या जोरावर भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत भारतीय संघाने दुसरे स्थान पटकावले आहे.
भारतीय संघ 16 गुणांसह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया 2 सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर इंग्लंडचा संघ 2 सामने जिंकून पाचव्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचे 18 आणि इंग्लंडचे 9 गुण आहेत. भारतापेक्षा जास्त गुण असूनही संथगतीचा ऑस्ट्रेलियाला फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाला-10 गुण आणि इंग्लंडला-19 गुणांचा दंड आयसीसीकडून ठोठावण्यात आला आहे.
पाकिस्तानने पटकावले अव्वल स्थान
आता गुणतक्त्यातील पाच सर्वोच्च संघांच्या यादीत ा पाकिस्तान 100 टक्के आणि एकूण 24 गुणांसह सर्वोच्च आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकले. भारत 66.67 टक्के आणि एकूण 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पावसामुळे भारताचा एक सामना अनिर्णित राहिला होता. ऑस्ट्रेलियाने विजयाच्या 30 टक्केवारीने आणि एकूण 18 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाला 2 सामन्यात विजय आणि 2 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला. स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाला हे नुकसान सहन करावे लागले.
वेस्ट इंडिज चौथ्या स्थानावर आहे. ज्याचे 16.67 टक्के गुण आणि एकूण 4 गुण आहेत. वेस्ट इंडिजला एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि एक सामना अनिर्णित राहिला. इंग्लंड 15 टक्के गुणांसह एकूण 9 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडने दोन सामने जिंकले आणि दोन गमावले. एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही सामने गमावल्यानंतर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी आतापर्यंत एकही कसोटी मालिका खेळलेली नाही.