भारत विरुद्ध श्रीलंका : भारताने नाणेफेक जिंकून घेतला ‘हा’ निर्णय!

| कोलंबो | वृत्तसंस्था |

आशिया कप 2023 च्या सुपर फोर सामन्यात आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण जो जिंकेल तो जवळपास फायनलला जाईल. भारताने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज कोलंबोमध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला तर अंतिम सामना खेळण्याचा निर्णय होईल. पण, श्रीलंका घरच्या मैदानावर खेळणार आहे, त्यामुळे ते हलक्यात घेता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानसोबतचा सामना संपताच भारत श्रीलंकेला हरवण्याची तयारी करताना दिसत होता. हवामानाचा विचार केला तर पावसाचा प्रभाव सामन्यादरम्यान दिसू येऊ शकतो.

Exit mobile version