भारतीय हॉकी संघ अंतिम फेरीत

कोरियाचा पराभव करत पदक केले निश्चित

| चीन | वृत्तसंस्था |

भारतीय पुरूष हॉकी संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात कोरियाचा 5 – 3 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. याचबरोबर भारताचे रौप्य पदक निश्चित झाले असून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या हॉकी संघाकडून आता सुवर्ण पदकाची आशा आहे. भारतासाठी पहिला गोल उपकर्णधार हार्दिक सिंगने केला. मनदीप सिंगने दुसरा गोल केला. ललित उपाध्यायने तिसरा गोल केला. चौथा गोल अमित रोहिदासने तर पाचवा गोल अभिषेकने केला. कोरियासाठी जंग मांजेने पहिला, दुसरा आणि तिसरा गोल केला.

सामन्यात भारताने पहिला गोल पाचव्या मिनिटाला झाला. भारतीय संघाचा पहिला शॉट कोरियन गोलकीपरने रोखला, पण चेंडू हार्दिक सिंगकडे परत आला. त्याने रिबाउंडवर कोणतीही चूक केली नाही आणि चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. भारताने अकराव्या मिनिटाला दुसरा गोल केला. गुरजंतने जास्त वेळ चेंडू स्वतःकडे ठेवला. चेंडू हाताळत तो कोरियाच्या डी. कडे गेला आणि त्याने गोलपोस्टजवळ उभ्या असलेल्या मनदीप सिंगकडे तो पास केला. मनदीपने कोणतीही चूक न करता गोल पोस्ट मध्ये टाकला. भारतासाठी तिसरा गोल 15व्या मिनिटाला झाला. विवेकने चेंडूसह कोरियाच्या डी. तो गुरजंत पास झाला. गुरजंतने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. कोरियन संघाने त्याचा फटका रोखला. मात्र, कर्णधार हरमनप्रीतने कसा तरी चेंडूवर ताबा मिळवत तो ललित उपाध्यायकडे पास केला. ललितने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला.

कोरियाने 17व्या मिनिटाला पहिला गोल केला. पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत त्याने सामन्यात आपले खाते उघडले. कोरियासाठी पहिला गोल जंग मांजेने केला. कोरियाने 20व्या मिनिटाला दुसरा गोल केला. जंग माझीने पुन्हा एकदा चमत्कार केला आणि आपल्या संघाला सामन्यात परत आणले. 24व्या मिनिटाला अमित रोहिदासने भारतासाठी चौथा गोल करून टीम इंडियाला सामन्यात खूप पुढे नेले. 42व्या मिनिटाला जंग माजीने कोरियासाठी तिसरा गोल करून भारताची आघाडी 4-3 अशी कमी केली. अभिषेकने 54व्या मिनिटाला गोल करून भारताला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अखेरच्या क्षणी त्याने केलेल्या गोलने भारताला दोन गोलांची आघाडी मिळवून दिली, जी निर्णायक ठरली. भारतीय संघ 2014 नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2018 मध्ये भारताला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानला हरवून कांस्यपदक जिंकले. 6 ऑक्टोबरला अंतिम फेरीत भारताचा सामना चीन किंवा जपानशी होऊ शकतो.

Exit mobile version