ग्लासगो | वृत्तसंस्था |
हवामानबदलासारख्या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजझ 26 परिषदेत संपूर्ण जगासमोर भारताची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी हवानबदलाची ही समस्या गंभीर असून सन 2070 पर्यंत भारतातील कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणले जाईल असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारताच्या या भूमिकेचे जगभरात स्वागत होत आहे.
नरेंद्र मोदी यांनी कार्बंन उत्सर्जन कमी करण्याचे आश्वासन दिले. भारत 2070 पर्यंत शून्य कार्बनचे उद्दिष्ट गाठेल असे मोदी म्हणाले. तसेच मी आज येथे आलो आहे तर आज भारत देशाचे ट्रॅकरेकॉर्ड सांगतो. भारत आज रिन्यूएबल एनर्जी निर्मितीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. जगातील पूर्ण लोकसंख्येच्या अर्धे लोक भारतात वर्षभरात फक्त रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेने सन 2030 पर्यंत उत्सर्जनाच्या बाबतीत नेट झिरोवर येण्याचे लक्ष्य समोर ठेले आहे, असेही आश्वसन मोदी यांनी जगाला दिले