पत्रकार रवीश तिवारी यांचे निधन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पत्रकार रवीश तिवारी यांचे शनिवारी (ता.19) सकाळ निधन झाले. निधनसमयी ते चाळीस वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आईवडील आणि भाऊ असा परिवार आहे. जून 2020 पासून ते कॅन्सरशी झुंज देते होते. रवीश तिवारी हे ’दी इंडियन एक्स्प्रेस’ चे राष्ट्रीय राजकीय संपादक आणि राष्ट्रीय ब्युरोचे प्रमुख होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्र सरकार, त्यात राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका, पंतप्रधान कार्यालय, संरक्षण, राजनयिक आणि पायाभूत सुविधा, ग्रामीण, कृषी, राजकारण आणि नुकतेच उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार आदींचे त्यांनी वार्तांकन केले आहे.

Exit mobile version