• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

‘जय भीम’चे अभिनंदन!

Varsha Mehata by Varsha Mehata
November 18, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
स्त्रीशक्ती, चक दे!
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम
वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होता.
(आम्ही नुसते उसासे टाकले तरी बदनाम होतो; त्यांनी खून केला तरी त्याची चर्चा होत नाही)
सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी शायर अकबर इलाहाबादी यांचा हा प्रसिद्ध शेर आठवण्याचे कारण म्हणजे अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ या चित्रपटाच्या निमित्ताने देशभरात निर्माण झालेला धुरळा. प्रदर्शित होताच या तमिळ चित्रपटाने केवळ रसिकांची आणि समीक्षकांची मने जिंकलेली नाहीत तर नवे राजकीय वादळही निर्माण केलेले आहे. एका बाजूला हा चित्रपट माध्यम आशयाच्या मांडणीविषयी देशातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवा अजेंडा मांडत आहे तर त्याच वेळी समाजातील विषमतेच्या भीषण परिस्थितीवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट राजकारणाच्या खोटे मुखवटे उघडे पाडू लागलेला आहे. आपल्या देशातील परिस्थितीवर ज्याची नजर आहे, त्याला पोलीस कोठडीत पोलिसांच्या अमानुष अत्याचारात मृत्यू पावण्याच्या प्रकारांबद्दल माहिती असेलच. नुकतीच अशी एक केस उत्तर प्रदेशात घडली, जेथे अल्ताफ नावाच्या 22 वर्षांच्या मुलाला पोलीस कोठडीत मृत्यू आला. अशी अगणित प्रकरणे आपल्या देशात आहेत. सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 2018 ते 2020 या दोन वर्षांत सुमारे साडेतीनशे जण पोलिसांच्या छळाला बळी पडले. गुन्हा कबुल करावा म्हणून पोलीस आरोपीवर अनन्वित शारिरीक छळ करतात आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रातील एक गाजलेले उदाहरण म्हणजे ख्वाजा युनुस प्रकरण. या तरुणाला बाँबस्फोटाच्या आरोपाखाली पकडले गेले आणि आता खुद्द कोठडीत असलेल्या सचिन वाजे यांनी त्याचा अमानुष छळ केला. त्यात त्याला मृत्यू आल्यानंतर त्याचे प्रेत परस्पर जाळून नष्ट केल्यानंतर सदर आरोपी दुसरीकडे नेला जात असताना पळून गेला आणि फरारी आहे असे फाईलमध्ये नोंदवून ठेवले. त्याचे नाव अजूनही पळून गेला असेच आहे, प्रत्यक्षात त्याचे प्रेत जाळून नष्ट करण्यात आले. अशाच एका रसकण्णू या विवाहित आदिवासी तरुणाला 25 वर्षांपूर्वी एका चोरीच्या आरोपाखाली अटक करून त्याचा अनेक दिवस छळ केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा मृतदेह लांब राज्याच्या सीमेवर टाकून तो पळून जात असताना गाडीने ठोकर दिल्याने मरण पावला असे भासवले. त्याची गरोदर पत्नी पार्वतीने आपल्या नवरा नेमका कशाने मेला यासाठी दिलेला लढा आणि त्याला पुढे मुख्य न्यायाधीश बनलेल्या वकिल के. चंद्रू यांनी दिलेली साथ यावर हा ‘जय भीम’चित्रपट आधारित आहे. जवळपास तीन दशकांपूर्वीच्या एका लढ्याच्या पार्श्‍वभूमीवर ही कथा घडत असली तरी देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे झाली तरी समाजातील विषमता नष्ट होण्याचे तर दूरच, या समाजातील सर्वाधिक कमकुवत वर्गाचा छळ आणि अन्याय यात काहीही फरक पडलेला नाही, अशी विषण्ण करून देणारी जाणीव हा चित्रपट करून देतो. त्याचबरोबर अशा स्वत:ला सुशिक्षित समजणार्‍या समाजाला जी चर्चा नकोशी वाटते, त्याला व्यावसायिक चित्रपटाच्या मुख्य प्रवाहात आणून आरशात पाहण्यास भाग पाडता येते आणि त्याचा समाज संवेदनशीलतेने स्वीकारही करतो, अशी सकारात्मकताही या चित्रपटाने निर्माण केली आहे. मात्र आपल्या समाजात तेही आहेत जे अशा विषमतेवर जगतात. त्यांना समता आणि वैश्‍विक मानवतेची मूल्ये मान्य नसतात. त्यांनी या चित्रपटाच्या विरोधात आवाज उठवला आणि यातील जातीय विषमतेचा उल्लेख केला, जातीचे नाव घेतले, अशा निमित्ताने न्यायमूर्ती चंद्रू यांचे पात्र पडद्यावर साकारलेल्या अभिनेता सुरीया याच्यावर हल्ला करणार्‍यांना एक लाखाचे बक्षिस जाहीर केले. म्हणजे समाजात तुडवण्यासाठी, शोषणासाठी एक वर्ग अस्तित्वात राहिला पाहिजे, मात्र त्याबद्दल बोलले तर तो गुन्हा, असा एक वर्ग सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात डोके वर काढून द्वेष आणि जातीपातीच्या भिंती अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याला चपराक या चित्रपटाच्या चाहत्यांनी दिली आहे. सुरीयाचे चाहतेही मोठ्या प्रमाणात त्याच्या बाजूने उभे राहिले. अन्य मोठे कलाकार उभे राहिले. आणि अर्थात पोलीस संरक्षण त्यांना दिले गेले आहे. सुरीया स्वत: अनेक वर्षे दानशूर म्हणून प्रख्यात आहे. त्याने आणि जय भीमच्या चमूने दाखवलेल्या धाडसामुळे एक महत्त्वाचा विषय चर्चेत आला आहे. त्याबद्दल ते सगळे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले सगळे अभिनंदनास पात्र आहेत.  

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक भत्ता द्यावा: पुरोगामी युवक संघटनेची मागणी

Next Post

नव्या धार्मिक ध्रुवीकरणाकडे?

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
नव्या धार्मिक ध्रुवीकरणाकडे?

नव्या धार्मिक ध्रुवीकरणाकडे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?