• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

लयलूट

Varsha Mehata by Varsha Mehata
March 9, 2023
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प जनतेचा महासंकल्प असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पुढील वर्षी निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे या महासंकल्पामध्ये सवलती आणि खैरातींची लयलूट असेल हे अपेक्षितच होते. फडणवीस तिला जागले आहेत. शेतीतील दुर्दशा सध्या चर्चेत आहे. सरकार त्यावरून बॅकफूटवर गेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर सरकारचा विशेष कटाक्ष आहे. शेतकर्‍यांना केंद्र सरकारतर्फे दरवर्षी सहा हजार रुपयांना अनुदान दिले जाते. आता राज्य सरकारतर्फे तितकीच रक्कम दिली जाणार आहे. याला नमो महासन्मान असे अगडबंब नाव देण्याची गरज मात्र अनाकलनीय आहे.  तेलंगणा सरकारने सर्वात प्रथम ही योजना यशस्वीपणे राबवली. तिथे तर दोन्ही हंगामांसाठी हे पैसे दिले जातात. शिवाय शेतकर्‍यांनी जमीन पड ठेवली तरी त्यांना ही मदत दिली जाते. अनेक योजनांची सरकारने यापूर्वी घोषणा केली होती. त्यांचा अर्थसंकल्पीय भाषणात समावेश करून नवीनच काही सांगतो आहे असे दाखवण्याची टूम गेल्या काही वर्षांपासून आली आहे. फडणवीसांनीही तिचा आधार घेतला आहे. जलयुक्त शिवार ही त्यांचीच एकेकाळची लाडकी योजना. तिच्यात भ्रष्टाचार झाल्याचा महाविकास आघाडीचा दावा होता. पण हे आरोप ते तडीला नेऊ शकले नाहीत. आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारने पहिली घोषणा केली होती ती जलयुक्त शिवार पुन्हा लागू करण्याबाबत. आता तिचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना केवळ एक रुपयात पीकविमा काढण्यात येणार आहे. ते स्वागतार्ह आहे. पण विमा कंपन्यांबाबतचा शेतकर्‍यांचा अनुभव अतिशय वाईट आहे. नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सरकार काय करणार आणि विमा कंपन्यांना कसा चाप लावणार हे अधिक महत्वाचे आहे. शेतकर्‍यांना तातडीने वीजपंप जोडणी देणे किंवा दिवसा वीज पुरवण्यासाठी विशेष तरतुदींचेही विश्‍लेषण करावे लागणार आहे. अर्थसंकल्पामधील योजनांना पारंपरिक संस्कृत नावे देण्याची निर्मला सीतारामन खोड फडणवीसांनीही उचललेली दिसते. त्यानुसार पंचामृत ध्येयावर आधारलेला हा अमृतकालातील अर्थसंकल्प आहे असे ते  म्हणाले. मात्र नाव मोठे लक्षण खोटे असा हा प्रकार आहे. शेतकरी, आदिवासी, महिला इत्यादींच्या योजना अशाच गोष्टींची गठडी त्यात वळण्यात आली आहे. महिलांसाठी एसटीच्या तिकिटदरात पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा आकर्षक आहे. पण मुळात अशाच प्रकारच्या असंख्य सवलतींनी एसटी टेकीला आली आहे. यापायी होणारा तोटा वेळेवर भरून देण्याची आपली जबाबदारी सरकार पार पाडत नाही. आता आधीच्या सवलतींमध्ये ही नवीन भर पडणार आहे. एसटीला पगाराचे पैसे देण्यासाठीही सरकारकडे भीक मागावी लागते. त्यावरही आधी कारभार सुधारा असे कर्मचार्‍यांना ऐकावे लागते. आता ते अधिक ऐकावे लागेल असे दिसते. दरम्यान एसटीच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याची घोषणाही अशीच फसवी आहे. सध्या एसटीच्या साध्या गाड्या रद्द करून त्या जागी एसी गाड्या चालू करण्याचा धडाका लावण्यात आला आहे. अगदी कोकणासारख्या भागातही खेडोपाडी जाणार्‍या बर्‍याच सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर इलेक्ट्रिक बसेस कोठे व कशा प्रकारे वापरल्या जाणार हे पाहायला हवे. भुसावळमध्ये हायड्रोजन प्रकल्प उभारण्याची योजनाही संदेहास्पद आहे. कारण, वापरासाठी परवडेल असा हायड्रोजन उत्पादन करणे सोपे नाही. प्रगत देशांनाही ते साध्य झालेले नाही. महाराष्ट्र सरकार त्यात काय करणार हा प्रश्‍न आहे.  लेकलाडकी यासारख्या योजना जुन्यांचीच नवी आवृत्ती वाटते. वीस हजार आशासेविकांची भरती केली जाणार आहे. पण ही किती दिवसात होणार हे स्पष्ट नाही. शिवाय, सध्याच्या आशासेविका व अंगणवाडी सेविकांनाच पगारवाढीसह अनेक मागण्या सरकारने टांगत्या ठेवल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना बिघडलेले मोबाईल दुरुस्त करून देण्यासाठी सरकारकडे पैसे आणि इच्छाशक्ती दिसत नाही. त्यासाठी त्यांना सारखे मोर्चे काढावे लागतात. नव्या आशासेविकांच्या वाट्याला तरी अधिक चांगला अनुभव यावा अशी अपेक्षा आहे. मातंगांसाठी 25 हजार घरे राखीव केल्याचा निर्णय सरळपणे एका समाजाला मतांसाठी आपल्याकडे खेचून घेण्यासाठीची युक्ती आहे. नाहीतरी पूर्वापार दलितांपैकी मांग व चर्मकार समाजाला आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न होता. त्यातलेच हे पुढचे पाऊल म्हणायला हवे. मुंबईच्या सुशोभीकरणासाठी एक हजार कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. येती महापालिका निवडणूक सरकारच्या डोळ्यापुढे आहे. मुंबई आता कोणत्याही नियोजनाच्या पलिकडे गेली आहे. तिला वरवर पावडर-कुंकू करण्याने काहीही साध्य होण्यासारखे नाही. अशा योजना  बिल्डरांच्या फायद्याच्या ठरतात असा पूर्वीचा अनुभव आहे. यावेळीही वेगळे काही होण्याची अपेक्षा नाही. मराठी भाषा व संस्कृतीसाठीच्या तरतुदींमधून ठोस काय हाती लागणार हा प्रश्‍न आहे. यासाठी आधीपासूनच अनेक संस्था अस्तित्वात आहेत. आता त्यात नवी भर पडणार आहे. अमरावतीतील रिध्दपूरला मराठी विद्यापीठ करण्याची घोषणा आकर्षक असली तरी या विद्यापीठात शिकणार कोण व त्यांना रोजगार काय मिळणार हा महत्वाचा प्रश्‍न आहे. सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी पन्नास कोटी देण्याची योजना स्वागतार्ह आहे. पत्रकारांना आजारपणातील मदतीसाठी पन्नास कोटी देण्यात येणार आहेत. पण त्यातील अटी जाचक आहेत हे पूर्वीही दिसून आले आहेत. नदीजोड प्रकल्प तसेच सिंचन योजनांसाठीच्या तरतुदी खरोखर नवीन असतील तर ते स्वागतार्ह आहे. कोकणातील सिंचन  व खारभूमी विकासासाठी केलेली तरतूदही आवश्यकच होती. धार्मिक स्थळे व स्मारके यांच्यासाठी दिलेले कोट्यवधी रुपये हे लोकानुनयाचाच प्रकार अधिक आहे. यापूर्वी केलेल्या किती घोषणा किती प्रत्यक्षात आल्या याची एक श्‍वेतपत्रिका सरकारने जारी करायला हवी. विद्यार्थ्यांना सध्या आहे तितकी शिष्यवृत्तीही मिळत नाही. वाढीव रकमा त्यांना कुठून मिळणार असा प्रश्‍न आहे. शिक्षणसेवकांच्या मानधनातील वाढ घसघशीत आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटींवर नेण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र विविध योजनांसाठी ही  जी तरतूद आहे त्यासाठीचे उत्पन्न कसकसे येणार हा प्रश्‍नच आहे.   

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

इलेव्हन फायटर शहापूर विजयी

Next Post

हायब्रीड बियाणे समज गैरसमज

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!

हायब्रीड बियाणे समज गैरसमज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?