• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

परम झोल

Varsha Mehata by Varsha Mehata
October 2, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
संकट आणि मार्ग
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिला या निवासस्थानासमोर स्फोटके भरलेले वाहन आणि नंतर मनसुख याचा खून इथपासून सुरू झालेला रहस्यमय अनाकलनीय घटनाक्रम तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची खंडणी वसूल केल्याच्या आरोपापर्यंत आला. त्यातील अनेक सुरस व चमत्कारीक घटनाक्रमांनी व आरोपांनी अवघा देश गांगरला. आता या कहाणीत विलक्षण ट्वीस्ट आला असून हा देशभर खळबळ उडवून देणारा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच आता कोणालाही सापडेनासे झाले आहेत. देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्यावरही अनेक आरोप आणि त्यांच्याविरोधात अनेक एफआयआर दाखल झाले होते. आता मात्र खुद्द तपास यंत्रणांनादेखील ते सापडत नसून ते देश सोडून गेले असावेत, असा कयास आहे. एनआयएने ऑगस्टमध्ये परमबीर सिंह यांना अनेकदा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले, मात्र ते चौकशीसाठी आले नाहीत. त्यामुळे नेमके परमबीर सिंह आहेत कुठे? हा प्रश्‍न सगळ्यांनाच पडला असताना कानोकानी येत असलेल्या खबरानुसार ते रशियाला गेले आहेत असे समजते. मात्र पोलीस अधिकार्‍यांचे नियामक खाते असलेल्या गृहखात्यालाही त्यांच्याविषयी काहीही माहिती नाही. खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील ही कबुली दिली आहे. त्यामुळे एकंदर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ते रशियाला गेले असतील अशी जोरदार चर्चा असली तरी ते एक सरकारी अधिकारी या नात्याने सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत, असे वळसे पाटील म्हणाले आहेत. परमबीर सिंह जर पळून गेले असतील, तर ते परवानगी घेऊन जातील का? त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली असल्याने जर ते भारताबाहेर गेले असतील, तर ती त्यांच्यासाठी चांगली बाब नाही, हे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनाही माहित असणारच. त्याचप्रमाणे अशा प्रतिष्ठित पदावर ज्येष्ठतम नेमणुकीवर असलेले अधिकारी म्हणून लपण्याचे आणि गायब होण्याचे, तसेच परदेशी नाहीशेे होण्याचे अनेक छुपे मार्गही त्यांना माहिती असणार. आपला शेजारदेश नेपाळ हा जगात कोठेही अजिबात संशय न येता जाण्याचे प्रवेशद्वार आहे, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अनधिकृत वृत्तानुसार परमवीर यांनीही याच मार्गाचा वापर केला आहे. तसेच अशा प्रकारे गायब होणारे ते काही पहिले उच्चाधिकारी नाहीत. असे म्हणतात की आयएएस, आयपीएस अधिकारी हा आपल्या कारकिर्दीत आठशे ते हजार कोटी रुपयांपर्यंतची कमाई करतो. स्वत:ला आणि पुढच्या सात पिढ्यांनाही परदेशात कोठेही सुरक्षित आयुष्य घालवायला ती पुरेशी असते. अर्थात अन्य क्षेत्रानुसार यालाही सन्माननीय अपवाद आहेतच. तथापि, परमवीर यांची चमकदार कारकिर्द अशी काळोख्या, अदृश्य वाटांवरून नाहिशी व्हावी, यासारखे आपल्या देशाचे दुर्दैव नाही. भाजपा नेत्यांचा आशिर्वाद असल्यानेच परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेण्याचे धाडस केले अशी सुरुवातीलाच चर्चा सुरू होती. अँटिला प्रकरणी एप्रिल मध्ये सचिन वाझेच्या अटकेनंतर एनआयएने सर्वात प्रथम परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला होता. हे प्रकरण उजेडात आले तेव्हा वाझे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होता. एनआयएच्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांचाही सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्यानेच त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते, पण त्यांनी उत्तर दिले नाही. त्याचबरोबर देशमुख प्रकरणी राज्य सरकार कारवाई करेल, या भीतीने त्यांनी मुंबई सोडली होती व चंदीगडमध्ये वैद्यकीय कारण देत मुक्काम केला होता. तसेच त्यांनी न्यायालयातही आपल्याविरोधातील कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनावणीत परमबीर सिंह यांच्यावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढत, ‘गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत?’ अशी विचारणा केली होती. गृहविभाग मे महिन्यापासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, तो अजूनही झाला नाही आणि आता होण्याची शक्यता कमी दिसते. देशात गुन्हे करून परदेशी जाणारे अनेक निघाले. त्यांना पकडणारेच आता गुन्हे करून देशाबाहेर गायब होत आहेत. व्यवस्थेतूनच मदत मिळाल्याशिवाय हे शक्य नाही. नुकताच युपीएससीचा निकाल लागून त्यात तरुण या सेवेत, अशा पदांवर येत असताना त्यांच्यापुढे काय आदर्श आहेत, हे पाहता चिंता अधिक वाढते.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

पैसे नसताना जलजिवन मिशनच्या निवीदा कशाला

Next Post

सासवणे भेटीत बापूजींना पोरबंदराची आठवण

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
सासवणे भेटीत बापूजींना पोरबंदराची आठवण

सासवणे भेटीत बापूजींना पोरबंदराची आठवण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?