• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

हिमाचल पडद्यामागचे राजकारण

Varsha Mehata by Varsha Mehata
December 16, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अजय तिवारी

काँग्रेस पक्षात प्रचंड बंडखोरी; भाजपकडे मात्र प्रचंड साधनसामुग्री. नरेंद्र मोदींसह अन्य नेत्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये ठाण मांडलेले.. तरीही भाजपला इथे सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्याचे कारण अंतर्गत गटबाजी आणि भाकरी न फिरवल्याचा परिणाम. काँग्रेसने मात्र हिमाचल प्रदेशातील जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांना हात घातला. देशभरात वाईट प्रकारे पडझड होत असताना काँग्रेस हिमाचलमध्ये कशी उभी राहिली?

हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सरकार बदलण्याची परंपरा कायम राहिली. राज्यातील 68 पैकी 40 जागा जिंकून काँग्रेसने बहुमताचा 35 हा आकडा पार केला. त्याच वेळी प्रथा बदलण्याचा नारा देणार्‍या भाजपच्या जागा 44 वरून 25 झाल्या. भाजपने 19 जागा गमावल्या. अपक्षांनी तीन जागा जिंकल्या. सत्ताविरोधी लाटेमुळे भाजपचा पराभव झाला, हे यामागचे एकमेव कारण नाही. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमी 76 टक्के मतदान झाले. आजपर्यंतचा हा विक्रम झाला. जादा मतदान भाजपवरच्या नाराजीमुळे झाले. या वेळी सरकारी कर्मचारी आणि सफरचंद उत्पादक शेतकरी सरकारवर नाराज होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळी भाजपला सहा टक्के कमी मते मिळाली. यापैकी दोन टक्के मते काँग्रेसच्या खात्यात गेली तर उर्वरित चार टक्के मते अपक्ष आणि ‘आम आदमी पक्षा’कडे गेली. यातून काँग्रेसला निवडणुकीपुर्वी हाती असलेल्या जागांपेक्षा 19 जागा जास्त मिळाल्या. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही अपक्षांना तीन जागा जिंकण्यात यश आले. त्याच वेळी, पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या ‘आप’लाही 1.1 टक्के मते मिळाली. माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्याकडे दुर्लक्ष करणे भाजपला महागात पडले. भारतीय जनता पक्षातील प्रचंड गटबाजी आणि ठराविक घराण्यातील व्यक्तींना देण्यात आलेली उमेदवारी हे नाराजीचे मुख्य कारण ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभर घराणेशाहीवर बोलतात आणि हिमाचल प्रदेशमध्ये मात्र भाजप ठराविक घराण्यातील व्यक्तींना उमेदवारी देत होता. त्यामुळे तिथे नाराजी होती. ही आणि अशी अनेक कारणे आता राजकीय विश्‍लेषक बोलून दाखवत आहेत.
गुजरातमध्ये भाजपने निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्रिमंडळ बदलले. त्यामुळे सत्ताविरोधी लाट थोपवण्यात गुजरातमध्ये भाजपला यश आले, परंतु हिमाचल प्रदेशमध्ये तसे घडले नाही. या राज्यात मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याविषयी प्रचंड नाराजी होती. त्यांना पक्षातूनच विरोध होता, तरीही पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवले. त्याची किंमत भाजपला मोजावी लागली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचा गृहजिल्हा असलेल्या हमीरपूरमध्ये भाजपचा धुव्वा उडाला. या जिल्ह्यातल्या पाचपैकी चार जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर अपक्ष विजयी झाला. या वेळी धुमल यांनी स्वत: निवडणूक लढवली नाही. धुमल गट या निवडणुकीपासून पूर्णपणे अलिप्त राहिला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री ठाकूर यांनी धुमल गटाला गेल्या पाच वर्षांमध्ये बाजूला ठेवले. ठाकूर यांनी हमीरपूर लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या तरी धुमल स्वत: फारसे सक्रिय नव्हते. जणू धुमल गटालाही भाजपने निवडणूक जिंकावी असे वाटत नव्हते. भाजपला निवडणुकीपूर्वीच विद्यमान आमदारांबद्दल लोकांच्या मनात असलेली नाराजी जाणवली होती; पण त्याला सामोरे जाण्याच्या रणनीतीमध्ये भाजप अपयशी ठरला. तिकिटे कापली गेलेल्या दहा विद्यमान आमदारांनी बंडखोरी केली. नड्डा आणि अन्य नेत्यांनी दिलेला कारवाईचा इशाराही त्यांनी जुमानला नाही. नड्डा यांची ‘डिनर डिप्लोमसी’ भाजपच्या उपयोगाला आली नाही. धरमपूर मतदारसंघातून सलग सात निवडणुका जिंकण्याचा विक्रम करणार्‍या मंत्री महेंद्रसिंह ठाकूर यांचा मुलगा रजत ठाकूर यांना तिकीट देण्यात आले; मात्र त्यांचाही पराभव झाला.
तिकीट वाटपानंतर राज्यातल्या 68 पैकी 21 जागांवर भाजपमध्ये बंडखोरी झाली. किन्नौरमध्ये माजी आमदार तेजवंत नेगी यांनी तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि तिथे भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. देहरा जागेवर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे होशियार सिंग हे सलग दुसर्‍यांदा विजयी झाले. निवडणुकीपूर्वी भाजपने सिंग यांना पक्षात घेतले; मात्र त्यांना तिकीट दिले नाही. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन निवडणूक लढवली. पक्षाचे उपाध्यक्ष कृपाल परमार यांच्या बंडखोरीमुळे मंत्री राकेश पठाणिया यांना फतेहपूरची जागा गमवावी लागली. कुल्लू आणि मनालीच्या जागांवरही भाजपच्या बंडखोरांनी पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपचे बंडखोर के. एल. ठाकूर यांनी अपक्ष म्हणून नालागडची जागा जिंकली. चंबा सदर जागेवर बंडखोरी करणार्‍या इंदिरा कपूर यांच्यामुळे भाजपचा काँग्रेसकडून पराभव झाला. या वेळी भाजप सरकारमधले दहापैकी आठ मंत्री पराभूत झाले. निवडणुकीत पराभूत झालेल्या मंत्र्यांमध्ये सुरेश भारद्वाज, रामलाल मार्कंडा, वीरेंद्र कंवर, गोविंदसिंह ठाकूर, राकेश पठाणिया, डॉ. राजीव सैजल, सर्वीन चौधरी, राजेंद्र गर्ग यांचा समावेश होता. मंत्र्यांपैकी ठाकूर यांच्याशिवाय केवळ बिक्रम ठाकूर आणि सुखराम चौधरी यांनाच निवडणूक जिंकता आली. खरं तर जयराम यांच्या मंत्र्यांबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. भाजपच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचणं फार कठीण असल्याची लोकांची तक्रार होती. या मंत्र्यांनी लोकांची महत्त्वाची कामंही करून घेतली नाहीत. कामाच्या आघाडीवरही या मंत्र्यांची कामगिरी अत्यंत खराब होती.
निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणातल्या प्रतिकूल अहवालानंतरही भाजपच्या अनेक मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली आणि ती अंगलट आली. हिमाचल प्रदेशमध्ये लष्करातील निवृत्त जवानांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना महत्वाची होती. भाजपशासित हरयाणा आणि अन्य राज्ये जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीचे ठराव करत असताना हिमाचल प्रदेशमध्ये मात्र त्याबाबत मौन बाळगले गेले. काँग्रेसने मात्र या जुनी पेन्शन योजना, तीनशे युनीटपर्यंत वीज मोफत आदी लोकानुनयी घोषणा केल्या. मोदी यांनी त्याची संभावना ‘रेवडी संस्कृती’ अशी केली. हिमाचल प्रदेशमध्ये एकूण 2.5 लाख सरकारी कर्मचारी आहेत, याचा अर्थ प्रत्येक दुसर्‍या घरातली किमान एक व्यक्ती सरकारी नोकरीत आहे. असे प्राबल्य असलेले सरकारी कर्मचारी विरोधात गेल्यास संबंधित पक्षाची सत्ता येत नाही. हिमाचलमधले सर्व कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी (ओपीएस) गेल्या दोन-तीन वर्षांपासून आंदोलन करत होते; परंतु सत्ताधारी भाजपने या विषयावर कधीच उघड भाष्य केले नाही. दुसरीकडे, काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची हमी दिल्याचा फायदा काँग्रेसला झाला.
भाजप सरकारच्या कार्यकाळात पॅकिंगशी संबंधित वस्तूंवर जीएसटी लावल्याने अनेक सफरचंद उत्पादक भाजपवर नाराज होते. हिमाचलमध्ये असे 24 विधानसभा मतदारसंघ आहेत, जिथे बहुतांश कुटुंबे आपल्या उपजीविकेसाठी सफरचंदाच्या शेतीवर अवलंबून आहेत. या 24 विधानसभा मतदारसंघातील 80 टक्के कुटुंबं पूर्णपणे सफरचंदाच्या व्यापारावर अवलंबून आहेत. यासाठी त्यांनी प्रदीर्घ आंदोलनही केले; पण सरकारने ऐकले नाही. यामुळे अप्पर हिमाचल आणि ‘अ‍ॅपल बेल्ट’मध्ये भाजपचा दारूण पराभव झाला. शिमला, कुल्लू, लाहौल-स्पिती आणि किन्नौरमध्ये त्यांची अवस्था वाईट होती. किन्नौर आणि लाहौल स्पिती या आदिवासी जिल्ह्यात काँग्रेसने बाजी मारली. सोलन, सिमला जिल्ह्यातही काँग्रेसला आठपैकी पाच जागा मिळाल्या. काँग्रेसने राज्यातील 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये देण्याची हमी दिली. असे आश्‍वासन मुळात ‘आप’ने दिले होते; परंतु काँग्रेसनेही ते दिले. मात्र ‘आप’ने निवडणुकीपूर्वीच मैदान सोडल्यामुळे महिलांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. यावेळी हिमाचलमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी सहा टक्के अधिक होती. हिमाचलला कर्मचार्‍यांचे राज्य म्हटले जात असले तरी जयराम यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार गेल्या पाच वर्षांमध्ये नोकर्‍या देण्यात अपयशी ठरले. आपल्या कार्यकाळात झालेल्या नियुक्त्यांमुळे श्री. ठाकूर सातत्याने वादात राहिले. काँग्रेसला वेळेआधीच हा मुद्दा जाणवला. पक्षाने त्याचा फायदा उठवला.
काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक लाख नोकर्‍या देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन प्रियांका गांधी यांनी प्रत्येक सभेत आणि रॅलीत दिले होते. काँग्रेसने पाच वर्षांमध्ये पाच लाख नोकर्‍या देण्याचे आश्‍वासनही दिले होते. हिमाचलमधील तरुण मोठ्या संख्येने सैन्यात जातात. केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी लागू केलेल्या ‘अग्निवीर’ योजनेबद्दलही हिमाचलमध्ये प्रचंड नाराजी होती. काँग्रेसच्या वतीने प्रचाराची धुरा सांभाळणार्‍या प्रियांका गांधी यांनी प्रत्येक रॅलीत या योजनेला उघड विरोध केला आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास ही योजना बंद केली जाईल, असेही सांगितले. लोकांचा भाजपवर रोष असल्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला आणि पाहता पाहता भाजप सत्तेतून बाहेर गेला.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

मराठी मनांचा संताप 

Next Post

वेश्र्वी येथे भरधाव कार चालकाने कांदा विक्रेत्याला उडवले

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post

वेश्र्वी येथे भरधाव कार चालकाने कांदा विक्रेत्याला उडवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?